हदगाव दि ३० : -हदगाव तालुक्यातील बामनीफाटा परीसरातील शीबदरा,पीपंरखेड,करमोडी, चीचंगव्हान ,पळसा,कवाना सह अनेक गावातील शेतकर्याचे परतीच्या पावसामुळे शेतातील खरीब पिकाचे अतोनात नुकसान झाले . परंतु हदगाव तालूक्यात पीकविमा उतरविलेल्या तालुक्यातील ७५ हजार ३५ शेतकऱ्यांना अद्यापही प्रधानमंत्री पीकविमा मंजूर झाला नाही . खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पीकविमा मंजूर होईल , अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात असून या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा करावी लागत आहे . _ _ _ हदगाव तालुक्यातील खारिपाच्या पेरण्या पूर्ण केल्यानंतर सोयाबीन , ज्वारी व कापूस या पिकांचा पीकविमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांनी व्याजाने , उसवारिने पैसे काढून ऑनलाईनपीकविमा भरणाऱ्या दुकानासमोर रात्री बे रात्री तासनतास रांगेत उभे राहून आपल्या पिकांचा पीकविमा उतरविला . तालुक्यात खरिपाची पिके काढण्यास आली असतानाच परतीच्या पावसाने हाहाकार माजविला . त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली . नगदी पीक सोयाबीन हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले , पाणावलेले डोळे घेऊन दिवाळी सारखा मोठा सण शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवीत आपल्या लेकीबांळी बरोबर साजरा केला . तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे आत्महत्येचा मार्ग अवलंबून आपली जीवन यात्रा नुकसान झाल्याचे मान्य करून संपउन टाकली त्यांना आर्थिक मदत जाहीर करून ती तत्काळ देण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे मात्र पीकविमा कंपनी कुंभकर्ण झोपेतून जगीचच झाली नसल्याचे पहावयास मिळत आहेत . तालुक्यात मोठ्या प्रमाणत खरीप पिकाचे नुकसान झाले असताना पीकविमा कंपनीने अद्यापही याची दखल घेतली नाही . आपल्या पिकाला. नैसर्गिक आपत्तीतून नुकसान झाल्याने मदत मिळावी , या उद्देशाने पीकविमा काढून देखील काहीच फायदा होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत . शासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन पीक विमा कंपनीला याबाबत जाब विचारून शेतकऱ्याना पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा , अशी मागणी तालुक्यातील बामनीफाटा परीसरातील शेतकऱ्यांतून केली जात आहे .आता तरी पीकविमा चा शेतकर्याला लाभ मिळेल का असा सवाल शेतकरी करत आहेत
नांदेड जील्हा प्रतीनीधी संदीप तूपकरी